दिवा (प्रतिनिधी) अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण शिवभक्तांनी केलेच.हा विजय राजकीय पक्षांचा नाही तर शिवभक्तांचा असल्याची प्रतिक्रिया समाजसेवक अमोल केंद्रे यांनी दिली आहे,परंतु प्रत्यक्षात शिवरायांचा आणि भीमरायाचा पुतळा उभा राहील तेव्हाच मागणी पुर्ण होईल,तोच दिवस आनंदाचा, अविस्मरणीय असेल असं म्हटले आहे.
गेली कित्येक वर्षापासून दिवा टर्निंग येथील चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज दिवा चौक नाव देऊन शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी समस्त दिवेकरांची मागणी होती.समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी वेळो वेळी प्रशासनास निवेदन दिली.मोर्चा काढला तेव्हा १० जणांना अटक झाली होती.16 दिवस आमरण उपोषण केले.पुन्हा ३ दिवस आमरण उपोषण केले आणि दिवा चौकास छत्रपती शिवाजी महाराज चौक मंजूर करण्यास प्रयत्न केले,आंदोलन केले,उपोषण केले, प्रत्यक्षा आज दिवा चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज दिवा चौक हे नाव मिळाले आहे.
त्यामुळे हा विजय दिवा शहरातील राजकीय पक्षांचा नसून दिवा शहरातील समस्त शिवभक्तांचा आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव देऊन शिवरायांचा अश्वरूढ पुतळा उभा राहण्यासाठी केसेस घेणाऱ्या,आंदोलन मोर्चा काढणाऱ्या समाजसेवक अमोल धनराज केंद्रे सौ अश्विनी अमोल केंद्रे व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लढणाऱ्या शिवभक्तांचा आहे.शिवभक्तांच्या लढ्याला आज यश मिळाले असले तरी ते यश अपूर्ण आहे.ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा उभा राहील आणि दिवा शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा राहील त्या दिवशी शिवभक्तांची भीम अनुयायांची जनतेची मागणी पूर्ण होईल अश्या प्रतिक्रिया समाजसेवक अमोल केंद्रे यांनी दिल्या आहेत.


