लांजा दि.१६ ( प्रतिनिधी) लांजा कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या घनकचरा प्रकल्प विरोधात ३४ दिवसांपासून सुरूअसलेल्या उपोषण कर्त्याची प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. याबाबत नाराजी व्यक्त करुन प्रशासनाकडून
तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा माजी मंत्री आमदार शिवसेना नेते (उबाटा) पक्षाचे आ.भास्करराव जाधव यांनी दीला आहे
आमदार भास्करराव जाधव यांनी आज दुपारी दीड वाजता कोत्रेवाडीतील उपोषण कर्ते यांची भेट घेऊन माहीती जाणुन घेतली.जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून कोत्रेवाडीतील घनकचरा प्रकल्पा विरोधातील उपोषण कर्ते याबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले.३४ दीवस उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे.राजकारण काही असो प्रशासनाकडून दखल घेतलीच पाहीजे असेही यावेळी उपोषण कर्ते ग्रामस्थाना सांगितले .जर दोन दिवसात प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.तर मी तुमच्या सोबत आहे.मी स्वतः शिवसेना रस्टाइलने रस्ता रोको करु हा प्रश्न धसास लावणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. कागदोपत्री पुरावे ग्रामस्थांकडे असताना घनकचरा प्रकल्प विरोधातील उपोषण कर्ते यांना निर्णय देण्यास प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही का झाली नाही?असा सवाल यावेळी उपस्थित करुन नाराजीही भास्करराव जाधव यांनी व्यक्त केली.
दि. १४ ऑगस्ट २०२५ पासून तहसील कार्यालय समोर ग्रामस्थांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा ३४ वा दिवस असूनही प्रशासनाने अजूनही या गंभीर प्रश्नाची दखल घेतली नाही आहे. लांजामध्ये आजतागायत एवढे दिवस आंदोलन झालेलं नाही. ३४ दिवस ग्रामस्थ उपोषणाला बसूनही नगरपंचायत, प्रशासन किंवा कोणतेही जबाबदार अधिकारी भेटीला आलेले नाहीत हि दुर्दैवी बाब असून ग्रामस्थावर अन्यायकारक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अन्यथा कोत्रेवाडीतील ग्रामस्थासह शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल. असेही यावेळी जाधव यांनी सांगितले.
उपोषणकर्त्या कोत्रेवाडी बाबत कार्यवाही करा अन्यथा रस्ता रोको करणार : आमदार भास्करराव जाधव
उपोषणकर्त्या कोत्रेवाडी बाबत कार्यवाही करा अन्यथा रस्ता रोको करणार : आमदार भास्करराव जाधव
लांजा दि.१६ ( प्रतिनिधी) लांजा कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या घनकचरा प्रकल्प विरोधात ३४ दिवसांपासून सुरूअसलेल्या उपोषण कर्त्याची प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. याबाबत नाराजी व्यक्त करुन प्रशासनाकडून
तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा माजी मंत्री आमदार शिवसेना नेते (उबाटा) पक्षाचे आ.भास्करराव जाधव यांनी दीला आहे
आमदार भास्करराव जाधव यांनी आज दुपारी दीड वाजता कोत्रेवाडीतील उपोषण कर्ते यांची भेट घेऊन माहीती जाणुन घेतली.जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून कोत्रेवाडीतील घनकचरा प्रकल्पा विरोधातील उपोषण कर्ते याबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले.३४ दीवस उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे.राजकारण काही असो प्रशासनाकडून दखल घेतलीच पाहीजे असेही यावेळी उपोषण कर्ते ग्रामस्थाना सांगितले .जर दोन दिवसात प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.तर मी तुमच्या सोबत आहे.मी स्वतः शिवसेना रस्टाइलने रस्ता रोको करु हा प्रश्न धसास लावणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. कागदोपत्री पुरावे ग्रामस्थांकडे असताना घनकचरा प्रकल्प विरोधातील उपोषण कर्ते यांना निर्णय देण्यास प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही का झाली नाही?असा सवाल यावेळी उपस्थित करुन नाराजीही भास्करराव जाधव यांनी व्यक्त केली.
दि. १४ ऑगस्ट २०२५ पासून तहसील कार्यालय समोर ग्रामस्थांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा ३४ वा दिवस असूनही प्रशासनाने अजूनही या गंभीर प्रश्नाची दखल घेतली नाही आहे. लांजामध्ये आजतागायत एवढे दिवस आंदोलन झालेलं नाही. ३४ दिवस ग्रामस्थ उपोषणाला बसूनही नगरपंचायत, प्रशासन किंवा कोणतेही जबाबदार अधिकारी भेटीला आलेले नाहीत हि दुर्दैवी बाब असून ग्रामस्थावर अन्यायकारक होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अन्यथा कोत्रेवाडीतील ग्रामस्थासह शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल. असेही यावेळी जाधव यांनी सांगितले.

